शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:28 IST

सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जमावाने शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून या ‘युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. ...

सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जमावाने शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून या ‘युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. या संशयितांना सोडल्यानंतर तणाव निवळला.आंदोलनामुळे सातारा शहरात सकाळपासून कार्यकर्ते पायी व दुचाकीवर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यामुळे राजवाडा, पोवई नाका, सातारा बसस्थानक, भूविकास बँक, गोडोली, विसावा नाका आदी प्रमुख रस्त्यांवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. सकाळी करंजे नाका परिसरात रिक्षाची वाहतूक थांबवून त्याची काच फोडली. त्यामुळे मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. तसेच काही युवकांना ताब्यात घेतले.दरम्यान, शहरातील निघालेली दुचाकी रॅली तेथे आली. त्यांनी युवकांना सोडावे, अशी मागणी केली. त्यास पोलिसांनी नकार दिल्याने पोलिस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. तसेच युवकांच्या नातेवाइकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिस त्यांना शाहुपूरी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्यापाठोपाठ नातेवाइकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. त्यानंतर युवकांना सोडा नाही तर आम्हालाही अटक करा, अशी मागणी केली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी त्या युवकांना सोडले.दरम्यान, दुपारी महामार्गावरील देगावफाटा परिसरातील प्रिती हॉटेलच्या पार्किंगमधील एका कारवर दगडफेक करून काच फोडली गेली. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन युवकांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. या तिघांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले असता येथेही जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली.दरम्यान, काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना ‘या युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. यावेळी पोलिस व जमावामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवकांना समज देवून सोडले.संदीप पाटीलदिवसभर आॅन फिल्डजिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील सकाळपासून सर्वत्र लक्ष ठेवून होते. सातारा शहरातील फिरून बंदोबस्त पाहिला. तसेच दिवसभरात सातत्याने वायरलेसवरून कर्मचाºयांना सूचना देत होते. सातारा शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी व प्रमुख चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.साताºयात पोलिसांची रणनिती यशस्वीएखाद्या ठिकाणी काही घटना घडल्यास पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत होते. तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेऊन जमाव पांगवण्याची रणनिती पोलिसांनी आखली होती. त्यामुळे सातारा शहरात अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडल्या..फक्त संबंधितांनाच ताब्यात घेण्याची सूचनाकोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे बुधवारी सातारा जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळला गेला होता. दरम्यान, काही ठिकाणी तोडफोड झाल्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘हिंसाचाराला जबाबदार असणाºया मंडळींनाच केवळ ताब्यात घ्या. त्या ठिकाणी उपस्थित असणाºया बघ्यांना त्रास देऊ नका,’ अशा सूचनाही दिल्या होत्या.